शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रत्नागिरी स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:35 IST

रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आकस्मिक रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे ...

रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आकस्मिक रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत त्यांची ओखा व कोकणकन्या एक्स्प्रेसने मडगावला रवानगी केली.गेल्या दोन वर्षांपासून दररोज दादर येथून सायंकाळी ३.३० वाजता सुटणारी व रत्नागिरीत रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा रत्नागिरीतून मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. मात्र, ४ मे पासून रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी अशी या गाडीची फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. परंतु, ही माहिती प्रवाशांपर्यंत अद्याप पोहोचलेली नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.दादर पॅसेंजरने रत्नागिरी व पुढे सावंतवाडी ते मडगावपर्यंत जाण्यासाठी अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबियांसमवेत शनिवारी या गाडीने निघाले होते. शनिवारी सायंकाळी मुंबईतून निघालेली ही पॅसेंजर रेल्वे रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी स्थानकात आली.मात्र, ही गाडी मडगावकडे जात नसल्याने पुढे जाणारे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकले. ही गाडी मडगावपर्यंत सोडण्यासाठी प्रवाशांनी स्टेशनमास्तरांकडे मागणी केली. मात्र, पहाटे ४ वाजेपर्यंत प्रवाशांची काहीच व्यवस्था झाली नाही.संतापाचा बांध फुटलारत्नागिरी पॅसेंजर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारासदादर-मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे रात्रभर स्थानकावर ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला. पहाटे ४ वाजता सुमारे ३०० ते ४०० पुरुष प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. पूर्ण ट्रॅक अडविण्यात आला. अचानकपणे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनही अडचणीत आले. रेल्वे पोलीस व रत्नागिरी पोलिसांना स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले.अधिकाºयांनी घातली समजूतअचानक रेल्वे रोको उद्भवल्यानंतर कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडे अन्य अधिकाºयांसमवेत पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली. रत्नागिरी-मडगावदरम्यान मांडोवी व झुआरी रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रत्नागिरीतून मडगावकडे जाणारी ही गाडी येत्या ३० मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. अखेर अधिकाºयांनी या प्रवाशांची सकाळी ६ वाजता ओखा एक्स्प्रेस व कोकणकन्याने मडगावकडे रवानगी केली.