शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

रत्नागिरी स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:35 IST

रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आकस्मिक रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे ...

रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ आकस्मिक रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना समजावत त्यांची ओखा व कोकणकन्या एक्स्प्रेसने मडगावला रवानगी केली.गेल्या दोन वर्षांपासून दररोज दादर येथून सायंकाळी ३.३० वाजता सुटणारी व रत्नागिरीत रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सेवा रत्नागिरीतून मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. मात्र, ४ मे पासून रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी अशी या गाडीची फेरी बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. परंतु, ही माहिती प्रवाशांपर्यंत अद्याप पोहोचलेली नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.दादर पॅसेंजरने रत्नागिरी व पुढे सावंतवाडी ते मडगावपर्यंत जाण्यासाठी अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबियांसमवेत शनिवारी या गाडीने निघाले होते. शनिवारी सायंकाळी मुंबईतून निघालेली ही पॅसेंजर रेल्वे रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी स्थानकात आली.मात्र, ही गाडी मडगावकडे जात नसल्याने पुढे जाणारे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकले. ही गाडी मडगावपर्यंत सोडण्यासाठी प्रवाशांनी स्टेशनमास्तरांकडे मागणी केली. मात्र, पहाटे ४ वाजेपर्यंत प्रवाशांची काहीच व्यवस्था झाली नाही.संतापाचा बांध फुटलारत्नागिरी पॅसेंजर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारासदादर-मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे रात्रभर स्थानकावर ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला. पहाटे ४ वाजता सुमारे ३०० ते ४०० पुरुष प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. पूर्ण ट्रॅक अडविण्यात आला. अचानकपणे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनही अडचणीत आले. रेल्वे पोलीस व रत्नागिरी पोलिसांना स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले.अधिकाºयांनी घातली समजूतअचानक रेल्वे रोको उद्भवल्यानंतर कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडे अन्य अधिकाºयांसमवेत पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली. रत्नागिरी-मडगावदरम्यान मांडोवी व झुआरी रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रत्नागिरीतून मडगावकडे जाणारी ही गाडी येत्या ३० मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. अखेर अधिकाºयांनी या प्रवाशांची सकाळी ६ वाजता ओखा एक्स्प्रेस व कोकणकन्याने मडगावकडे रवानगी केली.